१६ सप्टेंबर, २०१२

निर्भेळ !!!!


           जेव्हा जेव्हा मी एखाद्या गोष्टीची  व्याख्या वाचते किंवा संज्ञा ऐकते ....माझ्या मनात नेहमी एक विचार येतो . जर कधी आपल्याला मानवी भावनांची व्याख्या करायची झाली तर ती काय होईल???
                      म्हणजे उदाहरणार्थ , 'राग'राग म्हणजे नेमकं काय  अस जर कुणी विचारलं तर आपण काय सांगू? प्रयत्न करूया?????? अं......."राग म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीचा स्वतःवरील ताबा सुटतो , डोळे लाल होतात , विचार करण्याची प्रक्रिया बंद होते, वगैरे वगैरे ......" अहं ....   पण , केवळ हीच रागाची सरळधोपट व्याख्या कशी होईल ?  कारण प्रत्येक व्यक्तीची राग आल्या नंतरची प्रतिक्रिया सारखी कुठे असते??? कोणी आदळआपट , तोडफोड करेल; कोणी आरडा-ओरडा करेल; तर कोणी बोलणचं टाकून देईल....जितक्या व्यक्ती , तितक्या प्रकृती! त्यामुळे सगळ्यांना लागू होईल अशी एकच व्याख्या कशी करता येईल, नाही का?  केवळ 'राग' चं  नव्हे  ; तर जितक्या मानवी भावना आहेत .....आनंद , दुःख ,निराशा ,आश्चर्य ........प्रत्येक भावनेबाबतीत असेच म्हणता येईल. शब्दांत कशी करणार त्यांची व्याख्या?   

        या भावनांना शब्दांत बांधणे जितके कठीण  तितकेच एकमेकांपासून विलग करणे हि अवघडच !  सगळ्या भावना एकमेकांत मिसळलेल्या रंगांसारख्या आहेत जणू! 
...आपण कोणते रंग एकमेकांत मिसळले आहेत ते ओळखू शकतो पण ,  एकमेकांतून ते वेगळे नाही करू शकत. आता हेच पहा ना! एखादे यश मिळाल्यावर आपल्याला खूप आनंद होतो पण, तो फक्त आनंद कुठे असतो?  आपण केलेल्या कष्टांचे फळ मिळाले म्हणून झालेले समाधान हि त्यात असतेच की सामावलेले . आणि जर मिळालेले यश अनपेक्षित असेल तर आश्चर्याचा सुखद धक्का ही असतोच  सोबतीला. किंवा एखादी गोष्ट नाही झाली आपल्या मनासारखी तर आपण चिडतो ; तेव्हा अपेक्षाभंगाची निराशा नाही वेगळी काढता येत त्यातून. कधी कोणी काही बोललं तर आपण रागावतो त्या व्यक्तीवर. पण , झालेल्या अपमानाचा सल असतोचं  त्यात कुठे तरी. या सगळ्या भावना कशा नकळत एकमेकांत मिसळलेल्या असतात. त्यातली कोणती  केवळ एकंच भावना नाही अनभवू शकत आपण ....तिच्या खऱ्या रुपात...!
                        किती मजेशीर आहे ना हा भाव-भावनांचा खेळ ? म्हणजे राग, लोभ, प्रेम, दुःख या सगळ्या भावना कशा असतात हे  खर तर  सगळ्यांनाच माहित असत. परंतु , ना आपण त्यांची व्याख्या करू शकतो ; ना त्यांना वेगवेगळ अनभवू शकतो ..........
                                  जर आपण  हे सगळे रंग एकमेकांत योग्य प्रमाणात मिसळले तर काय होईल??? ..............उरेल केवळ एकंच रंग.....'पांढरा' !
रंगात रंगुनी साऱ्या रंग त्याचा वेगळा !!!! तो बनलेला तर  असतो साऱ्या रंगांपासून पण त्याला स्वतःला मात्र कोणताच रंग नसतो .... त्यातून कोणता रंग  वेगळाही  नाही करता येत . 
            मग समजा ,  जर आपण सगळ्या भावना सारख्या प्रमाणात मिसळल्या तर काय उरेल ???........................उरेल एक  अशी अवस्था जिला कोणतीच भावना नाही.....यालाच तर स्थितप्रज्ञ अवस्था म्हणत नसतील???म्हंटल  सगळ्या भावना  आहेत पण , तरीही कोणतीच भावना नाही ..पांढरया रंगासारखी अवस्था ... स्वच्छ , निर्मळ, निर्भेळ !!!!
                                    कदाचित यालाच योगी, संन्यासी निर्विकार , निर्गुण म्हणत असतील.......सर्व काही असूनही , काहीच नाही !!!!!....
         मलाही अनुभवायचा आहे असा पांढरा रंग ..सगळ्यात मिसळलेला  पण  तरीही सगळ्यापेक्षा  वेगळा ............स्वच्छ , निर्मळ, निर्भेळ !!!!











३ टिप्पण्या:

Alone Dreamer म्हणाले...

tujhi likhanshaili khupshi miLati-juLati ahe..likhanshaili peksha vishay ani tyabaddalche mat....good post.. keep posting...

Unknown म्हणाले...

mi jya diwashi blog wachala tuzta; tewhach nahi ka bolale tula?

Harshal म्हणाले...

Today I checked few of the articles from some of my friends blog but this is unique and special one. Thanks for sharing and please keep it up!!!